Thursday, February 14, 2013

शतकोत्तर १४वा म्हणजेच ११४वा कार्यक्रम...


आजकाल मुंबईत दोन मराठी माणसं सहज गप्पा मारतानाही आपली मातृभाषा विसरुन हिंदी/इंग्रजीत बोलताना दिसतात. अपवादानेच मराठीत बोलत असली तरीही त्यात हिंदी-इंग्रजी भाषेतील शब्दांचा सर्रासपणे वापर करताना दिसून येतात. याला कारणीभूत आहे आपली - मराठी माणसाची मातृभाषेप्रतीची बेफिकीरी, उदासिनवृत्ती व बोटचेपेपणा... आणि म्हणुनच आज गरज आहे ती आपली - मराठी माणसाची मानसिकता बदलण्याची...

याचा एक भाग म्हणुन
२७ फेब्रुवारी रोजी - कविवर्य कुसुमाग्रज यांचे जन्मदिनी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधुन
"आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली" या आपल्या समाजाभिमुख उपक्रमाच्या वतीने

शनिवार दि. २३ फेब्रुवारी २०१३ रोजी सायं. ५.३० वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर - लिंकरोडलगत, कांदिवली (प.) येथे
आगळ्यावेळ्या व मातृभाषेविषयीच्या आपल्या जाणीवा जागृत करणारी
"मराठीतच बोला..." - उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत आयत्या वेळी सुचवलेया एका विषयावर
स्पर्धकाने ३-४ मिनिटांचे भाष्य सादर करताना
मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेतील एकही शब्द वापरता येणार नाही.

मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मुंबईकर - मराठी माणसाचा या स्पर्धेत सहभाग अपेक्षित असुन
कुटुंबिय व मित्रपरिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक





No comments: